महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर कारची ट्रकला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भूपेश बारंगे | वर्धा : जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून भीषण धडक दिली. यामुळे कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रात्री साडेबारा वाजता दरम्यान घडला.

डॉ. ज्योती क्षीरसागर (रा.वाशीम ), डॉ. फाल्गुनी सुरवाडे (रा.अमरावती ), भरत क्षीरसागर (रा. मालेगाव) अशी मृतकांची नाव आहे.

समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहे. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जातं असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला.

जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीस साहेब खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर त्यात तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...