राजकारण

लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखे वागणं बरं नाही; फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले असून संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर, संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

लोकशाहीमध्ये काविळ झाल्यासारखे वागणं बरं नाही. संसद भवन ही देशाची ताकद आहे. कमी वेळेत भव्यतेने बनले आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे. पण, मोदींच्या विरोधाचा ज्वर चढल्याने लोकसभेच्या मंदिराची पायरी चढायला तयार नाहीत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

तर, याआधीही इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या एनेक्स बिल्डींगचे व राजीव गांधी यांनीही संसदेतील ग्रंथालयाचे अनेक उद्घाटन केले होते. पण, त्यावेळी कधीही विरोध केला नाही. ज्या भव्यतेने संसद भवन तयार झालं ते यांना पचत नाही, अशीही टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, आप नेते अरविंद केजरीवाल यांनी उध्दव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. यावरही देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. केजरीवाल आणि ठाकरे यांची भेट झाल्याचा अतिशय आनंद आहे. भाजला पराभूत करण्यासाठी केजरीवाल कोणाशीही तडजोड करायला तयार होतील. तर, उद्धव ठाकरे कुणाच्याही बाजुला बसायला तयार झालेत. याआधीही असा प्रयत्न केला होता. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही, असा निशाणा फडणवीसांनी साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार