ताज्या बातम्या

वारिसे मृत्यू प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार - अजित पवार

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, कोकण विभागातल्या पत्रकाराला ज्या प्रकारे संपवण्याचा एक अॅक्सिडेंट दाखवला गेलाय याचा मधला कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. सरकार काय करतेय. पोलिस यंत्रणा काय करतेय. सगळे झोपा काढत आहेत का? असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, 27 तारिखपासून होणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये या विषयावर आम्ही आवाज उठवणार आहोत. वारिसे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा