ताज्या बातम्या

वारिसे मृत्यू प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करणार - अजित पवार

Published by : Siddhi Naringrekar

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, कोकण विभागातल्या पत्रकाराला ज्या प्रकारे संपवण्याचा एक अॅक्सिडेंट दाखवला गेलाय याचा मधला कोण मास्टरमाईंड आहे हे कळलं पाहिजे. सरकार काय करतेय. पोलिस यंत्रणा काय करतेय. सगळे झोपा काढत आहेत का? असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, 27 तारिखपासून होणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये या विषयावर आम्ही आवाज उठवणार आहोत. वारिसे मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...