ताज्या बातम्या

औरंगाबादनंतर देवेंद्र फडणवीस यांचा जालनामध्ये जल आक्रोश मोर्चा

Jal Akrosh Morcha : भाजप मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता

Published by : Shweta Shigvan-Kavankar

रवी जयस्वाल | जालना : जिल्ह्याला अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे सर्वसामान्यांना नागरिकांसह शेतकऱ्यांनाही नाहक त्रासाला सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील (Aurangabad) जल आक्रोश मोर्चानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जल आक्रोश मोर्चा (Jal Akrosh Morcha) काढण्यात येणार आहे.

देवेंद्र फडणवीस आज जालना शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जालना नगर परिषदेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील मामा चौक ते गांधी चमन चौक असा जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा संपल्यानंतर गांधी चमन चौकात फडणवीस यांची सभा देखील होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, संतोष दानवे, नारायण कुचे यांसह भाजपचे आमदार देखील उपस्थित असतील.

यावेळी भाजपकडून आगामी नगर परिषद निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या भाजपच्या जलआक्रोश मोर्चात भाजप मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी