amol kolhe sharad pawar
amol kolhe sharad pawar Team Lokshahi
राजकारण

शरद पवारांना जाणता राजा मानता का? अमोल कोल्हे म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नाशिक : स्वराज्यरक्षक, धर्मवीरनंतर आता जाणता राजावरून राजकीय वर्तुळात वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केला होता. यावरुन नव्या वादाला तोंड फुटले असून सत्ताधाऱ्यांनी छगन भुजबळांवर तोफ डागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, हे प्रत्येकाचे मत आहे. दुर्दैवाने आम्ही फक्त प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतिहास पोहचवण्याची कृती करायला हवी. मी एक गोष्ट मानतो की, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय आहे. माणसाच्या जन्मात येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवाच्या रुपात पोहचता येतं, याचे उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा अशी जर कुणी इतरांची तुलना करत असेल, तर स्वतः पवार साहेब सुद्धा ही गोष्ट अमान्य करतील. पण, सगळ्या परिस्थितीची माहिती असलेला, जाण असलेले नेतृत्व या भावनेतून म्हटलं असेल तर ती जाण असणं, ही गोष्ट वाईट नाही, असे म्हणत त्यांनी भुजबळांचे समर्थन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची कुणाशीही तुलना होत नाही आणि होऊ शकतही नाही आणि कुणी करण्याचा प्रयत्न देखील करू नये, इतकं स्पष्ट सगळ्या शिवभक्तांचे म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका. हे मी स्वतः सहित सगळ्यांना सांगतोय. कोणताही पक्ष, कोणतेही पद, कोणतीही खुर्ची शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासमोर शून्य आहे. अकारण हवा दिल्याने महत्त्वाचे प्रश्न बाजूला राहत आहे. या तरुणाईला आम्ही मूलभूत प्रश्नापासून जर बाजूला नेले, तर मेंढ्यांचा कळप आपल्याला तयार करायचा आहे का? की बलशाही राष्ट्राच्या दृष्टीने तरुणांना घडवायचे आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

ते पुढे म्हणाले, मी कधीच कुणाच्या शिवभक्तीवर शंका घेत नाही. आपल्या राजांचे आभाळभर कर्तृत्व आहे. आपण जर एकमेकांमध्ये वाद घालत बसलो, तर आपण कपाळ करंटे म्हटलो पाहिजे. हे चरित्र जाज्वल्य पद्धतीने सांगायला हवं. इतिहासाचे दगड भिरकवण्यापेक्षा, ते दगड रचले पाहिजे. एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून इतिहास पोहचविण्यासाठी उभे राहायला पाहिजे. या मोठ्या कार्यकर्तृत्वाला एकमेकांच्या मतभेदात, वादात अडकवू नये, असेही अमोल कोल्हे यांनी म्हंटले आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...