राजकारण

राऊतांना येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज; भाजप नेत्याची जोरदार टीका

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फेकू नंबर वन आहेत. गुगलवर फेकू शब्द सर्च केला की मोदींचा चेहरा दिसतो, असा जोरदार घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाप्रबोधन यात्रेत केला होता. याला आज भाजप नेते जगदीश मुळीक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांना येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, अशा शब्दात मुळीक यांनी राऊतांवर शरसंधान साधले आहे.

जगदीश मुळीक यांनी ट्विटरद्वारे संजय राऊतांवर टीका केली. शिशुपाल आता तुझा घडा भरला आहे. वेड्या माणसाकडे दुर्लक्ष करावे म्हणून संजय राऊत आणि त्यांची वक्तव्ये याकडे दुर्लक्ष करत असताना तो पंतप्रधान मोदींवर खालच्या पातळीची टीका करीत आहे. शिशुपाल चे 100 गुन्हे भगवान श्रीकृष्णाने माफ केले पण त्याचा पापाचा घडा भरला तेव्हा त्याला योग्य शिक्षा ही केली. तसेच संजय राऊतांचे झाले आहे.

मोदी हे भाजपचे नेते जरी असले तरी देशाचे पंतप्रधान आहेत व देशाचा अभिमान आहे. त्यांच्यावर आपली लायकी नसताना केलेली टीका म्हणजे संजय राऊतांचा पापाचा घडा भरत आला आहे हेच दर्शविते. उगाच लोकांची टाळकी भडकवण्या पेक्षा शिल्लक सेनेसाठी काही तरी कर, असा सल्लादेखील मुळीक यांनी संजय राऊतांना दिला आहे. संजय राऊत ना खरी गरज आहे ती आमच्या येथील प्रसिद्ध येरवडा मनोरुग्णालयात दाखल व्हायची, ती सोय आम्ही विनामूल्य करू, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, महाप्रबोधन यात्रेत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. दोन हजारांच्या नोटांची बंडलं कुणाकडे असतील तर ती ५० खोकेवाल्यांकडे आहेत. भाजपाच्या शेठजी गौतम अदानींकडे आहेत. मात्र कष्टकरी, शेतकरी, मजूर यांची अवस्था बिकट आहे, अशी टीका संजय राऊत यांनी नोटबंदी निर्णयावर केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे फेकू नंबर वन आहेत, असे त्यांनी म्हंटले होते.

सोलापूरमध्ये PM नरेंद्र मोदींचं 'इंडिया'आघडीवर शरसंधान, म्हणाले; "देशाला भ्रष्टाचार, दहशतवादात..."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा; मुरलीधर मोहोळ म्हणाले...

संजय राऊतांची PM नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका, पत्रकार परिषदेत म्हणाले; "मोदींचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम..."

Anil Desai: अर्ज भरण्यापूर्वी अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis : माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा