राजकारण

मी येतोय! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अंतरिम आदेशात राहुल गांधी यांच्या 'मोदी आडनाव' टिप्पणीवरून मानहानीच्या खटल्याला स्थगिती दिली. या आदेशानंतर काँग्रेस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. तसेच, कॉंग्रेसने मी येतोय, असे ट्विट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचे म्हणत सत्यमेव जयते कॉंग्रेसने म्हंटले आहे. तसेच, मी येतोय, प्रश्न सुरु राहतील, असा इशाराच मोदी सरकारला दिला आहे.

दरम्यान, मोदी आडनावाच्या मानहानीप्रकरणी शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे. या खटल्यात सर्वोच्च शिक्षा देण्यात आली होती. एवढी कठोर शिक्षा काय? हे न्यायाधीशांनी सांगायला हवं होतं, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हंटले आहे. या निर्णयामुळे आता राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. यासाठी त्यांना केवळ लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज करावा लागणार आहे.

IPL 2024 : चेन्नईच्या मैदानात आज MS धोनी खेळणार शेवटचा सामना? 'त्या' पोस्टमुळं चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळेंना संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "काळू-बाळूच्या तमाशाने तुमच्या कानाखाली..."

आपल्या छातीवर धनुष्यबाण होता, पण आता मशाल आहे? निवडणुकीत काय परिणाम होणार? उद्धव ठाकरेंनी रोखठोक सांगितलं, म्हणाले...

Allu Arjun: मोठी बातमी! अभिनेता अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Sanjay Raut : 'नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं', राऊतांचा खोचक टोला