Nitin Deshmukh
Nitin Deshmukh Team Lokshahi
राजकारण

सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदारांना माझ्या चौकशीचे आदेश द्या; देशमुखांचा शिंदेंना टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सुरज दहाट | अमरावती : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना बेहिशोबी मातमत्तेप्रकरणी एसीबीने नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशीही करण्यात आली होती. आता देशमुखांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा शोध घेत त्याची कागदपत्रे अमरावतीला सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या तहसीलदारांना पत्र लिहिले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील नितीन देशमुखांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर बेहिशेबी मालमत्तांच्या आरोपानंतर अमरावती एसीबीनं त्यांची चौकशी सुरू केली. त्यांना 17 जानेवारीला चौकशीसाठी अमरावतीच्या विभागीय कार्यालयात बोलविण्यात आलं होतं. आता देशमुखांच्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा शोध घेत त्याची कागदपत्रे अमरावतीला सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या तहसीलदारांना पत्र लिहिलं. आमदार देशमुखांचं मुळगाव सस्ती हे पातूर तालुक्यात आहे. अमरावतीच्या विभागीय कार्यालयानं पातूरच्या तहसीलदारांना संपत्तीच्या व्यवहारांच्या खरेदी-विक्रीची माहिती मागितली आहे. देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास शोधण्याचे आदेश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, आमदार देशमुख यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आपल्या चौकशीचे तपास करण्याचे आदेश द्या, असा टोला शिंदे सरकारला लगावला. तर, याआधी देशमुख यांनी थेट सोबत कपड्यांची बॅग घेऊन एसीबीसमोर हजर झाले. एसीबीसमोर हजर झाल्यानंतर आपल्याला अटक करतील व आत टाकतील. त्या हिशोबाने तयारीला केली असल्याची प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी दिली होती.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा