राजकारण

Rohit Pawar : महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

Published by : Siddhi Naringrekar

महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, गुजरातचे स्वामित्व घेण्यास महानंदला अखेर भाग पाडलेच. महानंदकडे असलेल्या मुंबईतील जमिनीवर डोळा असलेल्या दलालांनी महानंद जाणूनबुजुन तोट्यात आणत महानंदचा गेम केला. महाराष्ट्रात काय येईल याची गॅरंटी नाही पण महाराष्ट्रातून काय जाईल याची गॅरंटी देणारं हे राज्यसरकार गुजरातला अजून काय काय देणार?

जमिनीच्या काही तुकड्यांसाठी D_फॉर_दलाली करणे राज्यकर्त्यांना शोभत नाही. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे अनुयायी म्हणवून घेणारे आता भाजपच्या D_फॉर_दलालीवर आवाज उठवण्याची हिंमत दाखवतील का? असे रोहित पवार म्हणाले.

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात

"येत्या काळात धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु होतील"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Amol Kolhe: खासदार अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात, कोल्हे यांची लोकशाहीला प्रतिक्रिया

Punit Balan: पुनीत बालन यांनी सपत्नीक केलं मतदान, नागरिकांनाही केलं मतदान करण्याचे आवाहन