राजकारण

Sharad Pawar : मीही अनेक शपथा घेतल्या, पण राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण, कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, असा टोमणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना मारला आहे. त्यांनी आज पत्रकांराशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंडाळीनंतर दहा दिवसांनी मुंबईत परतल्यानंतर त्यांनी सागर बंगला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनावर राज्यापालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी राज्यपालांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवला व पुष्पगुच्छ दिले. नेमके यावरुनच शरद पवारांनी राज्यापाल भगत सिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे.

मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण, कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही. कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही, अशी टीका टोमणा शरद पवारांनी राज्यपाल यांच्यावर केला आहे. तसेच, आमदारांचा सुरत -गुवाहाटी-गोवा हा प्रवास सुखकर होण्यासाठी 'बरीच काळजी' घेतली असं सांगतात, असेही शरद पवार म्हंटले आहेत.

तर, शरद पवार यांनी पक्षाचा व्हिप पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी भाजपकडून युवा आमदार राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला अर्ज दाखल केला आहे. या निवडीसाठी शिवसेनेने व्हिप जारी केला आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी आम्ही व्हिप पाळणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.

निवडणूक आयोगाला फटकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर म्हणाले, "त्यांचा पराभव स्पष्टपणे..."

Daily Horoscope 21 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या धन-संपत्तीत होणार बक्कळ वाढ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 21 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"मोदी पराभवाच्या भीतीमुळं निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करतात"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

IPL 2024 Play Offs : प्ले ऑफचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास पुढे काय होणार? जाणून घ्या सविस्तर माहिती