क्रीडा

भारताला विजयी चौकार लगावण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. बांगलादेशने भारतासमोर 257 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशी संघाने 8 गडी गमावून 256 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. बांगलादेशचे सलामीवीर तनजीद हसन आणि लिटन दास यांनी पहिल्या विकेटसाठी 14.4 षटकांत 93 धावा जोडल्या. बांगलादेशकडून तनजीद हसनने हसनने केवळ 41 चेंडूत अर्धशतक केले.

तर, कुलदीप यादवने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले आहे. त्याने बांगलादेशचा सलामीवीर तनजीद हसनला (51) बाद केले. यानंतर चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशी फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. त्यामुळे बांगलादेशचा संघ केवळ 256 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले. याशिवाय शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.

दरम्यान, हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. हार्दिक पांड्या भारतासाठी नववे षटक टाकण्यासाठी आला, मात्र अवघ्या 3 चेंडू टाकल्यानंतर तो जखमी झाला. यानंतर हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले. हार्दिक पांड्या फलंदाजीला येणार नाही.

राज ठाकरे यांची आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याआधी युवराज सिंगचं मोठं विधान, म्हणाला; "विराट कोहली वर्ल्डकप मेडल..."