रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक वेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपलं महत्त्वं पटवून देण्यासाठी अशाप्रकारचं टोकाचं बोलत असतात. अशा प्रकारची वक्तव्यं गांभीर्यानं घेऊ नये असं फडणवीस म्हणाले आहे. रामदास कदम वरिष्ठांशी बोलतील. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या मनात लाडू फुटतायत पण महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करणार असं नितेश राणे म्हणालेत.