मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार आहे. प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तशी माहिती दिली आहे. जरांगेबाबत माझी तक्रार नाही पण त्यांच्या मागे कोण? जरांगेंच्या मागे कोण आहे त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे एकदा तपासावं लागेल असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर जरांगेंच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाल्याचंही फडणवीस म्हणाले. आधीचे मराठे मोर्चे शांततेत झाले होते पण काही लोकप्रतिनिधींची घरं जाळण्यात आली आणि त्यासोबतच तोडफोड सुद्धा झाली होती. त्यामुळे या आंदोलनाची चौकशी झाली पाहिजे.