Chanadrashekhar Bawankule
Chanadrashekhar Bawankule  Team Lokshahi
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष- बावनकुळे

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना अशातच आज राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. या विजयानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला स्पष्ट कौल दिला आहे. असे विधान यावेळी बावनकुळे यांनी केले.

आज नागपूर येथे पत्रकारांना बोलत असताना बावनकुळे म्हणाले की, "राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी 581 च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पार्टीचे सरपंच 259 ठिकाणी निवडून आले आहेत.

या निवडणुकीतही भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे सरपंच 40 ठिकाणी निवडून आले आहेत.म्हणूनच शिंदे आणि फडणवीस सरकारच्या काळात थेट जनतेमधून सरपंच निवडण्याच्या निर्णयाचे जनतेने संपूर्णपणे स्वागत केले आहे. दोन्हीचा एकत्रित विचार करता पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच लोकांनी निवडून दिले आहेत. या कौलाबद्दल आपण मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो." अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.

RBL Bank: आरबीएल बँकेची 12 कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

ओबीसी बहुजन पार्टीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी-शिवीगाळ केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप

RR VS LSG: सॅमसन आणि जुरेल यांनी केली नाबाद अर्धशतके! राजस्थानने लखनौचा 7 गडी राखून केला पराभव

IPL 2024 : मुंबई इंडियन्सविरोधात मॅकगर्क-स्टब्सचा झंझावात! शेवटच्या चेंडूवर दिल्लीनं जिंकला रंगतदार सामना

भाजपने मुंबई उत्तर-मध्य लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "राजकारणातून..."