राजकारण

Supriya Sule : महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला...

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून हा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात ही खेदाची बाब आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

संजय राऊत यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

राज ठाकरे यांची आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा

"मोदी तुम्ही माझ्याशी लढा, माझ्या आई-वडीलांचा अपमान केला, तर..."; उद्धव ठाकरेंनी PM मोदींना दिला इशारा

Dora Cake Recipe: मुलांच्या आवडीचा ‘चॉकलेट डोरा केक’ बनवा घरच्याघरी, जाणून घ्या रेसिपी...