ताज्या बातम्या

Vinayak Raut : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी स्वतःच्या मंत्री पदाची काळजी करावी 

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रत्येकजण एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

याच पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut ) यांनी केंद्रीय मंत्री  नारायण राणे  यांना खडेबोल सुनावले आहेत.

शिवसेना (shivsena) कोणाच्या ताब्यात जाणार नाही आणी कदापी  शिवसेना संपणार नाही त्यामुळे  केंद्रीय मंत्री  नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्वतःची काळजी व आपली राजकीय काळजी करावी.

राणे याचे मंत्री पद काही महिन्यात जाणार आहे, केंद्रीय मंत्रिपद मिळून पण त्यांनी चांगलं काम देशात केलं नाही अशी माहिती समोर येत आहे . तसेच  आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना मंत्री पद पालकमंत्री पद  मिळण्यासाठी मी स्वतः पक्ष प्रमुख यांच्याकडे मागणी केली होती आपल्यावर चुकीचा  आरोप आमदार  दीपक केसरकर करत आहेत. असे खळबळजनक विधान सावंतवाडीत पत्रकार परिषद मध्ये खासदार विनायक राऊत यांनी केलं.

सिंधुदुर्ग (Shindhudurg) जिल्ह्यात शिवसेना पुन्हा जोमाने उभारी घेणार आहे . सावंतवाडीत पुन्हा शिवसेनेचाच आमदार विजयी होणार आहे त्यामुळे शिवसेनेला ज्यांनी ज्यांनी फसवले त्याची हालत बेकार झाली आहे. राजकीय अस्तीत्व संपलं आहे . आज जे बंडखोर पळून गेले  त्यांना कदापि पुन्हा शिवसेनेत घेतले जाणार नाही आज आपले पाप लपवण्यासाठी संजय राऊत यांच्यावर हे बंडखोर आरोप करत आहेत. तसेच काही दोन खासदार शिंदे गटात जाऊ शकतात मात्र बाकीचे कोण जाणार नाही . असे राऊत यावेळी बोलले.

यावेळी आमदार वैभव नाईक . गौरीशंकर खोत , संदेश पारकर . संजय पडते , विक्रांत सावंत, जान्हवी सावंत, अतुल रावराणे , डॉ जयेंद्र परुळेकर , सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ वेंगुर्ला तालुका प्रमुख  बाळू परब ,सागर नाणोसकर बाळा दळवी तसेच शिवसेना कार्यकर्ते  पदाधीकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश