राजकारण

'उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत जुळवून घ्यावे अन् शिवसेना वाचवावी'

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सूरज दहाट | अमरावती : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. यानंतर अमरावतीत राणा दाम्पत्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, नवनीत राणा यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. अती करणाऱ्या लोकांची माती होते. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सोबत जुळवून घ्यावे व शिवसेना वाचवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त रवी राणा व नवनीत राणा यांनी अमरावतीच्या गडगडेश्वर मंदिरात जाऊन शंकराची पूजा करत दर्शन घेतलं. यावेळी राणा दाम्पत्याने धनुष्यबाण हातात घेऊन त्यातून तीर सोडला. यानंतर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. रामावर विश्वास ठेवणारे आणि हनुमंतांना मानणारे बाळासाहेब ठाकरे होते म्हणून त्यांनी धनुष्यबाण चिन्ह मागितलं होतं. आता ती कमान बाणातून निघाली आहे व खरी विचारधारा असलेल्या एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाणची कमान पोहचली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, अती करणाऱ्या लोकांची माती होते. आणि आता माती खाणाऱ्या लोकांचे दिवस आले आहेत. तर बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी डूबवली. आताही वेळ गेली नाही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसोबत जुळवून घ्यावे व शिवसेना वाचवावी, असा प्रहार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा